Corporate Chanakya
Pillai Radhakrishnan
इ. स.पूर्वी चौथ्या शतकात भारतात जन्मलेले ‘चाणक्य’ हे ‘विष्णुगुप्त’ आणि ‘कौटिल्य’ या नावांनीही प्रसिद्ध होते. शतकानुशतके विद्वानांनी चाणक्याच्या असामान्य विद्वत्तेचा गौरव केला आहे; ज्यांनी व्यवस्थापनशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशास्त्र, नेतृत्व, शासन, युद्धनीती, सैनिकी डावपेच, वाणिज्य प्रणाली आणि अशा विविध क्षेत्रांत क्षेत्रांत प्राविण्य प्राप्त केले. स्वत: चाणक्यांनी आपली या विषयांवरील १,५०० सूत्रे, १५ पुस्तकातील १५० खंडांमधून त्यातील १८० धड्यांमधून वर्गीकृत करून ठेवली आहेत. चाणक्यांनी नंद राजवटीचा पराभव करून त्या सिंहासनावर आपला समर्थ शिष्य चंद्रगुप्त मौर्य यास सम्राट म्हणून संस्थापित केले. म्हणूनच त्यांना ‘राजगुरू’ म्हटले जाते. अवघे जग जिंकण्याच्या मोहिमेवर निघालेल्या सिंकदराच्या पराभवाची व्यूहरचना देखील चाणक्यांच्याच सूपीक डोक्यातून निर्माण झाली होती. राज्यशास्त्राचे विचारवंत म्हणून त्यांनी मानव इतिहासात प्रथमच ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा विचार केला. त्या काळात भारत अनेक छोट्या मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यांनी सर्वांना एका छत्राखाली आणून ‘आर्यावर्त’ नामक राष्ट्राची निर्मिती केली, जे नंतर ‘भारत’ राष्ट्र झाले. आपले आयुष्यभराचे कार्य त्यांनी ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ आणि ‘चाणक्यनीती’ या ग्रंथांमधून शब्दबद्ध केले. आध्यामिक तत्त्वांवर आधारित अशा अर्थशास्त्राधारित राष्ट्राची निर्मिती करण्याकरीता जगभरातल्या राज्यकर्त्यांनी चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्रा’ चा वेळोवेळी आधार घेतला आहे. अर्थशास्त्राचे शब्दश: भाषांतर ‘संपत्ती विषयक संहिता’ असे होईल; पण खरे तर या ग्रंथात जगातील सर्वच विषयांवरील विवेचन आढळून येते. हा ग्रंथ म्हणजे ‘धनाचे ज्ञान’ याबरोबरच ‘ज्ञानाचे धन’ आहे असे म्हटले तर बिलकुल वावगे ठरणार नाही.
Kategorie:
Rok:
2016
Wydanie:
6
Wydawnictwo:
जयको पब्लिशिंग हाऊस
Język:
marathi
ISBN 10:
8184953216
ISBN 13:
9788184953213
Plik:
EPUB, 2.24 MB
IPFS:
,
marathi, 2016